लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिथे इतर पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. तिथे राष्ट्रवादी पक्षातुन जयदत्त क्षीरसागर यांच्या नंतर पुन्हा एकदा मुंबई शहरातील एका बड्या नेत्याने राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. वरळी-कोळीवाडा विभागातील माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिनभाऊ अहिरे यांनी राष्ट्रवादीचे बंद घडयाळ काढून हातात शिवसेनेचे शिवबंधन बांधणार आहे. त्यामुळे मुंबईतून लवकरचं राष्ट्रवादी हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे असेच चित्र दिसून येते.
पंरतु सचिनभाऊ अहिरे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण मुख्यतो शिरूर मतदार संघात निवडून आलेले खा. अमोल कोल्हे हेच आहे असेच बोलले जाते. काही दिवसापूर्वी अजित पवारांनी मुंबईतील विधानसभेची जबाबदारी ही खा. अमोल कोल्हे यांच्यावर सोपवलेली होती. परंतु कोल्हे यांच्यावर पुणे किंवा शिरूरची मतदार संघाची जबाबदारी सोपवण्याचे सोडून सचिनभाऊ अहिरे यांना डावलून कोल्हे यांना महत्व देण्याचे काम पवार कुटुंबांनी केलेले आहे.