श्रीलंका : भारत व श्रीलंका यांच्यात चालू असलेल्या अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या उल्लेखनीय कामगिरीने भारतीय संघाचे पारडे जड झाले.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने १३३.१ ओव्हर्स मध्ये सर्वबाद ६०० धाव केल्या. आजच्या दिवशी हार्दिक पंड्या व अजिंक्य राहणे यांनी अर्धशतक केले. श्रीलंका संघाची स्थिती मात्र दिवसाअखेर ५ बाद १५६ अशी होती. श्रीलंका संघात उपुल थरंगा व अँजेलो मॅथ्यूस यांनी अर्ध शतकी खेळी केली, उर्वरित सर्व फलंदाज चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरले.
भारतीय गोलंदाजीत सामी ने २ तर अश्विन व यादव यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. फॉलो ऑन टाळण्यास श्रीलंकेला आणखी २४४ धावांची गरज आहे.