मुंबई:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात असल्याचं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची चौकशी करण्यात येत आहे. तपासाचा न डगमगता सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
पुढील तीन ते चार महिन्यात राज्यातील…
केजरीवाल सरकारचा "शिक्षण पॅटर्न" आता महाराष्ट्रात राबविणार - उदय सामंत
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राबवलेल्या उच्च दर्जाच्या शिक्षणाचा पॅटर्न आता महाराष्ट्र सुद्धा राबवण्याचा विचार महाविकास आघाडी करत आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंतांनी आपचे नेते व शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांची दिल्ली येथे भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा…
फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची होणार चौकशी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेले आहे. काहीच दिवसापूर्वी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते आता त्या…
शिवभोजन थाळीला भरभरून प्रतिसाद, १८ हजाराहून ३६ हजारावर
अवघ्या दहा रुपयात उपलब्ध होणाऱ्या शिवभोजन थाळीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, या थाळींची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. शिवसेनेने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील जनतेला अवघ्या १० रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यात सत्ता येताच या योजनेची…
केंद्र सरकारने काम करावे, बोलणे आणि डोलणे कमी करावे - सामना
“केंद्र सरकारने काम करावे. बोलणे आणि डोलणे कमी करावे. दिल्लीच्या निवडणुकीत हे बोलणे आणि डोलणे दोन्ही अजिबात चालले नाही”, असा टोला शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून केंद्र सरकारला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसी येथील कार्यक्रमात…
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवू या - मुख्यमंत्री
आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपलं सरकार आहे. त्यामुळे आपणास जी कामे करायची त्याचे आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. गणपतीपुळेच नव्हे तर कोकणसह नवा महाराष्ट्र घडवायचं काम आपण सर्व जण मिळून करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री…
पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. आज उमरठ ता.पोलादपूर येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद रायगड आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्यावतीने नरवीर…
कोल्हापुरातील उद्योगधंद्याचे प्रलंबित प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडणार - संजय मंडलिक
सध्या कोल्हापुरातील उद्योगधंदयांची स्थिती बेताची आहे. औद्योगिक मंदीच्या काळात जीएसटीसह वीजेचे दर हा प्रश्नही समोर आहे. उद्योजकांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू, अशी ग्वाही खासदार संजय मंडलिक यांनी दिली. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (स्मॅक) जिल्ह्यातील नूतन लोकप्रतिनिधी आणि…
खाली खुर्च्या पाहून राज ठाकरेंनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले
लावरे व्हिडिओच्या माध्यमातून भाजपावर जोरदार टीका करणारे आणि खचाखच भरलेला जनसमुदाय असणाऱ्या राज ठाकरे अर्थात मनसेच्या संभाजीनगर येथील सभेला राज ठाकरे यांना खाली रिकाम्या खुर्च्यांना सामोरे जावे लागले आणि गर्दीची सवय असल्याने अक्षरश: वैतागून त्यांनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले. मनसेच्या संभाजीनगर मधील पहिल्यावहिल्या शिक्षक मेळाव्याने राज ठाकरेंच्या…
शिवसेना शाखा प्रमुखांच्या कामगिरीची दखल घेत पवारांनी कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला
शिवसेनेच्या शाखा प्रमुखांसारखे काम करा म्हणजे आपलाच विजय होईल असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पदाधीकारी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना शाखाप्रमुख नागरिकांचे प्रश्न सोडवितो.…