शिवसेना नेते व युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा दिनांक ३१ जुलै २०१९ ते ४ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित केला आहे. जळगाव ते नाशिकच्या पहिल्या टप्प्यात जनतेने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात सोलापूर व मराठवाडा येथील, दि. ३१ जुलै २०१९ रोजी सोलापूर व धाराशिव, १ आणि २ ऑगस्ट रोजी लातूर, नांदेड व परभणी, दि. ३ ऑगस्ट रोजी परभणीचा काही भाग व हिंगोली व दि. ४ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील विभागांना भेट देऊन आदित्यसाहेब ठाकरे जनतेचे आशीर्वाद घेणार आहेत.