Skip to content Skip to footer

अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीने चक्क २८० वेळा मागितली माफी

रिपब्लिक टीव्हीचे मुख्यसंपादक अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारतवर युनायटेड किंग्डममधील संवाद नियामक कार्यालाने कारवाही केली आहे. युकेमधील ऑफकॉमने वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क लिमीटेडला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावण्यात आलेला आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. रिपब्लिकचा युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे.

प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड रिपब्लिक भारतवर ठोठावण्यात आला आहे. मात्र आता या दंडाच्या बातमीनंतर रिपब्लिक टीव्हीसंदर्भातील आणखीन एका महिती समोर आली असून अर्बण यांच्या वृत्तसमुहाने या नियामक कार्यालाने घेतलेल्या आक्षेपावर तब्बल २८० वेळा माफी मागिल्याचा दावा करण्यात आला आहे.
गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीवरुन युकेमध्ये २६ फेब्रुवारी २०२० ते ९ एप्रिल २०२० दरम्यान द्वेष पसरवणारे वृत्तांकन केल्याप्रकरणी २८० वेळा माफीनामा दाखवण्यात आला. अर्णब यांनी पुछता है भारत या आपल्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केलेल्या मतांबद्दल आक्षेप नोंदवला होता. ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमामध्ये अर्णब यांनी बोलावलेल्या तज्ज्ञांबद्दल उच्चारलेल्या शब्दांवर आक्षेप नोंदवण्यात आला.

६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शीत झालेला हा भाग भारताच्या चांद्रयान २ मोहिमेसंदर्भात होता. या भागामध्ये भारत आणि पाकिस्तानची तुलना करण्यात आली होती. भारतातील अवकाश संशोधन आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर भाष्य करताना पाकिस्तान हा भारतावर सतत दहशतवादी हल्ले करणारा देश असल्याचा उल्लेख केल्याचं, संवाद नियामक कार्यालाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. वृत्तवाहिनीचा सर्व कारभार पाहणाऱ्या ऑफकॉमने दिलेल्या माहितीनुसार हा आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर वृत्तवाहिनीवर चालवण्यात आलेल्या माफीनाम्यामध्ये “संवाद नियामक कार्यालय, द ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्सने ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आलेला पुछता है भारतचा भाग पाहून त्यामध्ये वापरण्यात आलेल्या काही शब्दांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे काही दर्शक नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावरून ही कारवाही करण्यात आलेली आहे.

Leave a comment

0.0/5