पुणे: भारत संचार निगम लिमिटेडच्या किमान 200 टेलिफोन लाइन एमजी रोड परिसरात 23 जुलै, 2017 पासून बंद आहेत. तांब्याच्या केबल्सच्या चोरी मुळे आणि पावसाचे पाणी वायरला लागल्या मुळे या केबल्स बंद आहेत.
जीएसटी लागू झाल्या मुळे बीएसएनएलला अपेक्षित वायर बाजारात उपलब्ध नाहीत या वायर उपलब्ध करण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते, असे कंपनीचे अधिकारी सांगत होते.
कंपनीने आता वायर तसेच फॉल्ट असलेल्या जागा शोधल्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत समस्या निश्चित सोडवण्यात येईल असे तज्ञांनी सांगितले.