केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सीबीआयमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण झाला असून यासंदर्भात, विरोधक सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेत केंद्र सरकारवर हल्ला चढवत आहेत. काँग्रेसने आता याच मुद्यावरून उद्या २६ ऑक्टोबरला रस्त्यावर उतरत संपूर्ण देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी परस्परांविरोधात…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान बनण्यासाठी आमच्याकडे आकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जेंव्हा त्यांना तुम्ही पंतप्रधान होणार का? असा प्रश्न करण्यात आला. तेंव्हा 'आकडे असल्याशिवाय पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहू नये. राजकारणात नेहमीच पाय जमिनीवर असावेत' असे त्यांनी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले, काँग्रेसला देशात सत्तांतर घडवून आणायचं आहे. त्यामुळे काँग्रेस पंतप्रधानपदाच्या अटीवर अडून…
मालवण: सतत डिझेलचे दर वाढत असल्याने मच्छीमार मेटाकुटीस आले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील मच्छीमारी संस्थांचा मार्च २०१७ ते मे २०१८ या कालावधीतील सुमारे आठ कोटी रुपयांचा डिझेलचा परतावा शासनाकडे प्रलंबित आहे. मात्र शासनाच्या नव्या धोरणानुसार मच्छिमारांच्या डिझेल परतावा रकमेतून एनसीडीसी लाभार्थ्यांची थकीत कर्जाची रक्कम सोसायट्यांकडून वसूल करण्याचा डाव शासनाने आखला आहे. याला सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार फेडरेशनचा…
संपूर्ण देशात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वणवा पेटलेला आहे. जनतेच्या मनात संताप पसरला आहे. असे असतांना केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्याची मागणी केली आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये होणारी भाव वाढ रद्द करावी, त्यांचे दर कमी…
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या खुल्या प्रवर्गासाठी 25 टक्के आरक्षण देण्याचा विचार केला जात आहे अशी माहिती केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ऍट्रॉसिटी कायद्यात कुठलाच बदल केला जाणार नाही, तसेच ज्यांचा या कायद्याला विरोध आहे त्यांच्याशी चर्चा केली जाईल तसेच असल्याचेही त्यांनी सांगितले. आठवले झारखंडच्या दौर्यावर आहेत, रांचीमध्ये ते बोलत होते.
रालोआच्या बैठकीत खुल्या प्रवर्गाला…
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्याबदल मंगळवारी केंद्र आणि गुजरात सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी दावा केला की, गुजरात राज्यात बंद पडलेले कारखाने आणि बेरोजगारी यामुळेच गुजरातमधील हिंसाचार वाढत आहे.
राहुल गांधी यांनी याबदल फेसबुक पोस्ट केली अाहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांना…
मुंबई - काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मनसेकडून सोशल मीडियावर संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असून, परप्रांतीय मतांवर डोळा ठेवून ते अशी विधाने करत असल्याची पोस्टरबाजी करण्यात येत…
मुंबई: दहशतवादविरोधी लढाईतील मित्र म्हणून अमेरिकेने मागच्या पंधरा वर्षांत पाकिस्तान च्या झोळीत तब्बल सवादोन लाख कोटींची आर्थिक मदत घातली. मात्र एवढी अफाट खंडणी वसूल करूनही पाक अमेरिकेला सदैव मूर्खच बनवत राहिला. भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर एवढ्या उशिरा का होईना, पाकिस्तानची आर्थिक रसद रोखण्याचे शहाणपण महासत्तेला सुचले त्याचे स्वागतच करायला हवे, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनातून स्पष्ट करण्यात…
माजी पंतप्रधान 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांनी राज्याराज्यांतील जम्बो मंत्रिमंडळांवर नियंत्रण आणले आणि दूरदर्शी राजकारणाचा अंगीकार करीत सरकारी पैशांची उधळपट्टी आणि शासकीय मालमत्तेची नासाडी थांबवली. त्यामुळे सरकारचा पंधरा टक्के पैसा वाचला अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात'मध्ये वाजपेयी यांच्या स्वच्छ आणि दूरदर्शी राजकारणावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
16 ऑगस्टला वाजपेयींच्या निधनाची बातमी कळताच देशातील…
नवी दिल्ली - लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध अडविण्यासाठी विरोधक पुन्हा सक्रीय झाले आहेत. कॉंग्रेस क्षेत्रीय पक्षांसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या महाराष्ट्रासह सात राज्यांतील 252 जागांवर महाआघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपविरोधात महाआघाडीला आकार देण्याचे कार्य पुन्हा सुरू झाले आहे. देशभरातील क्षेत्रीय पक्षांच्या महत्वाकांक्षा आडव्या…