मुंबईतील काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी राजीनामा देत केला शिवसेना प्रवेश
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला होता. यानंतर त्यांनी काँग्रेस सदस्यपदाचाही राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे विठ्ठल लोकरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. तसेच मातोश्रीवर जाऊन त्यांनी थेट शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख…
बेस्ट दरकपात:मुंबईकरांची चार महिने आधीच दिवाळी
"बेस्ट" बसेसच्या दरामध्ये केलेली ऐतिहासिक दरकपात कालपासून लागू झाली. बसच्या किमान दरात तब्बल ३ रुपयांची कपात झाली. बेस्टच्या ५ किमी प्रवासासाठी ८ ऐवजी ५ रुपये मोजावे लागणार आहेत. १० किमीसाठी १०, १५ किमीसाठी १५ रुपये मोजावे लागतील. १५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी फक्त २० रुपये मोजावे लागतील. शिवसेना नेते आणि…
मुंबई महापालिका अधिकाऱ्याचे मुंबईकरांना पत्र..
पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असं म्हणत सर्वत्र टीका होत आहे. अशातच पालिकेतील एका अभियंत्याच्या नावाने मुंबईकरांना उद्देशून लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या भावना मांडणारं हे पत्र जसंच्या तसं आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत:
मुंबई महानगरपालिकेतील एका अतिशय जबाबदार व निस्वार्थी वरिष्ठ अभियंत्याचे मत व नागरिकांना…
पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची खरी कारणे नक्की वाचा
दरवर्षी मुंबईत प्रचंड पाऊस होतो आणि या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत होते. याचा दोष मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेला देण्याची प्रथा सुद्धा अजाणतेपणामुळे रूढ झाली आहे. मुंबईची तुंबई झाली असं म्हणत प्रत्येक पावसाळ्यात मुंबई महानगरपालिकेवर टीका केली जाते पण…
बीएमसी मुंबईकरांची समस्या एका ट्विटवर सोडवणार
मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईत अखेर दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत प्रचंड पाऊस पडतो. अशा वेळी मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करत आपले दैनंदिन व्यवहार पार पाडावे लागतात. समस्या निर्माण झाल्यावर त्या सोडवण्यासाठी आधी पालिकेपर्यंत पोहोचाव्या लागतात. एकूणच समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत वेळ जातो यंदाच्या पावसाळ्यात मात्र हे चित्र काहीसं वेगळं दिसणार…
शिवसेनेने करून दाखवलं ! बेस्ट झाली आणखी बेस्ट..
मुंबईकरांच्या दळणवळणाचे महत्वाचे साधन असलेल्या "बेस्ट"ची दरकपात अखेर काल जाहीर झाली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक दरकपात जाहीर झाली.यात बेस्टचे दर १५ स्लॅब ऐवजी ४ स्लॅबमध्ये राबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. "बेस्ट" बसचे किमान भाडे ८ रुपयांवरून ५ रुपयांवर आले आहे. त्यामुळे "बेस्ट"च्या ५ किमी…