विधानसभा निवडणुकीपूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ‘आदित्य संवाद’ कार्यक्रम जोरात सुरू असतानाच आता शिवसेनेने आणखी एक ‘माऊली संवाद’ उपक्रमाची सुरुवात केली आहे. शिवसेना सचिव आदेश बांदेकर महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकांतील महिलांशी ‘माऊली संवाद’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. निवडणुकीत एकुण मतदारांपैकी अर्धी मतदार संख्या ही महिलांची आहे. त्यामुळे या एवढ्या मोठ्या मतदार वर्गाला…
"महिलांना हात लावणाऱ्याचे हात-पाय भरचौकात छाटले पाहिजेत" असं मत शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सोलापुरात व्यक्त केलं. येथील वालचंद महाविद्यालयात आयोजित आदित्य संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी वरील मत मांडताच उपस्थित विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
हिंदू धर्मामध्ये गाईला माता मानलं जातं. महाराष्ट्रात गोहत्याबंदी केली आहे…
मुंबई : शहरातील वाहतूक कोंडीचा अनुभव तुम्हा वारंवार घेतला असेल. मात्र दस्तुरखुद्द वैमानिक वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशांवर विमानात बसून वैमानिकाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांसोबत हा प्रसंग मंगळवारी घडला.
मुंबईहून औरंगाबादला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय ४४२ विमानातील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. एअर इंडियाचे प्रवासी दुपारी ३ वाजता एअरबस ए…
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत बीडच्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी फक्त सत्तेसाठी आणि मंत्रिपदासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी अल्पावधीत केलेल्या विकासकामांमुळे आणि आणलेल्या निधीमुळे विरोधकांची तोंड बंद झाली आहेत. जून महिन्याच्या अखेरीस जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळालं. याचा फायदा करून…
शिवसेना नेते व युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा दिनांक ३१ जुलै २०१९ ते ४ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित केला आहे. जळगाव ते नाशिकच्या पहिल्या टप्प्यात जनतेने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात सोलापूर व मराठवाडा येथील, दि. ३१ जुलै २०१९ रोजी सोलापूर…
येन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिनभाऊ अहिरे यांनी अध्य्क्ष पदाचा राजीनामा देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष पद रिक्त ठेवणे हे येणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीला पक्षासाठी घातक आहे म्हणून शरद पवारांनी नवाब मलीक यांना अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारावा यासाठी स्वतः फोन करून सांगितले. परंतु महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी मलिक यांच्या…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र्वादीदी आणि काँग्रेस पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून भाजपा-सेना पक्षात प्रवेश करत आहे यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली होती. आमचे खत चांगले आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टोला शरद पवारांना टोला लगावला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी काल त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. आता मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार अस्लम शेख शिवसेनेच्या वाटेवर असून ते लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. तसे झाल्यास मालाड पश्चिम विधानसभेतून ते शिवसेनेचे उमेदवार असतील…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या (शनिवारी) वाढदिवस आहे. राज्यभरात तो उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्त राज्याच्या कानाकोपर्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्या वाढदिवसाला होर्डिंग्ज, पुष्पगुच्छ नकोत तर समाजाच्या, शेतकर्यांच्या आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी उपक्रम राबवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
२७ जुलै हा उद्धव ठाकरे यांचा…
लोकसभेच्या दारूण पराभवानंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तसेच आघाडीतून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर तसेच माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे देखील हाती बांधणार शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी देखील काही दिवसांपूर्वी…