लोकसभेच्या निवडणूका जश्या जवळ येत आहे तश्या, सर्वच राजकीय पक्षा मध्ये युतीचे वारे वाहू लागले आहे. पण येणाऱ्या निवडणुकीला भाजपा आपल्या मित्र पक्ष शिवसेनेकडे युतीसाठी प्रस्ताव पाठवत आहे. परंतु शिवसेना पक्षा तर्फे अजून शिवसेना-भाजपा युतीसाठी कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष बोलणी चालू झालेली नाही असे शिवसेना प्रतिनिधी कडून सांगण्यात येत आहे.
मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पक्षाच्या सर्व खासदारांसोबत झालेल्या बैठकीत वार्षिक ८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या मार्फत करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी अंतरिम वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून, ही मागणी शिवसेना खासदार लोकसभेत मांडणार आहे. ज्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये आहे. ते करमुक्त करण्यात यावे.…
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा दिखावा करणाऱ्या भाजपाचा खोटेपणा पुन्हा दिसून आला आहे. भाजपा किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी शेतीच्या वादातून एका शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबातील तीन महिलांना भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी मारहाण केली. त्यानंतर खड्ड्यातही जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या कुटुंबाने केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे आज सकाळी घडली…
आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलूया जे उघडपणे धमकी द्यायचे. जे मुंबई, देशाची राजधानी बनवू इच्छित होते, ज्याच्या दरबारात विरोधक देखील सहभाग घ्यायचे. त्यांचे नाव आहे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचे बालपणाचे नाव "बाळ केशव ठाकरे" होते, काळाबराबेर ते "बाळा साहेब ठाकरे" झाले व लाखो मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारे नेते बनले. बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार…
संसदेत अधिक प्रश्न विचारल्या बद्दल महाराष्ट्रातील मावळचे खासदार मा. श्रीरंग बारणे यांना सलग पाचव्यांदा चेन्नई येथील पंतप्रधान पॉइंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांची संसदेतील कामगिरी पहिली असता त्यांनी १०७६ विविध प्रश्न संसदेत मांडले असून, २८९ वेळा चर्चेत सहभाग घेतला आहे. त्यांची सभागृहात ९३ टक्के उपस्थिती नोंदवली गेली आहे. तामिळनाडू येथील राजभवनात…
आमच्यासाठी पक्ष हेच कुटुंब तर काहींसाठी कुटुंब हाच पक्ष आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. भाजप बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलले आहेत.
प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या पूर्व विभागाच्या सरचिटणीस पदावर नियक्ती झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी प्रियांका गांधींच नावं न काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी अपयशी ठरल्यानेच प्रियांका गांधींना काँग्रेसचं सरचिटणीस…
मुंबई – लंडनस्थित संगणक हॅकर शुजा याने ईव्हीएम घोटाळा प्रकरणाची माहिती मिळाल्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावर बोलताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘माझ्यासमोर काय बोलावे हा प्रश्न पडला आहे, या गोष्टीचे भांडवल करू इच्छिणारी राजकारणी मी नाही, मी ना हॅकर आहे, मी केवळ गोपीनाथ मुंडेची कन्या…
नवी दिल्ली – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सरचिटणीसपदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांचा या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश झाला असून हा काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने दोन सरचिटणीस नियुक्त केले आहेत. त्यानुसार उत्तर प्रदेश…
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर होऊन अधिक काळ लोटला आहे. दुष्काळामुळे शेतीसाठी सोडा, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही महाराष्ट्र्रात गंभीर होताना दिसत आहे. पाण्या अभावी पिकांचे नुकसान होत आहे, जनावरांसाठी चारा सुद्धा उपलब्ध नाही, शेतकऱ्यांना दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन अजून ही कागदावरच दिसत आहे. शेतकऱ्यांना नाइलाजाने आज पोटा-पाण्यासाठी शहरी भागात स्थलांतर व्हावे लागत आहे. इतका गंभीर प्रश्न, दुष्काळामुळे…
नवी दिल्ली – कन्हैया कुमारला लालूंचा राष्ट्रीय जनता पक्ष देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली आरोपपत्र दाखल झाल्यामुळे समर्थन देणार नसल्याच्या वृत्ताचे सीपीआयने खंडन केले आहे. सीपीआयकडून बेगुसराय मतदारसंघातून येणारी लोकसभा निवडणूक कन्हैया कुमार लढवणार असून आम्हाला राष्ट्रीय जनता दलाचा पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.
सीपीआय बेगुसरायमधून कन्हैया कुमार आणि उजिरपूरमधून रामदेव वर्मा यांना महाआघाडीचा उमेदवार म्हणून…